गुन्हे विश्व्

कौटुंबिक वादातून महिलेला बेदम मारहाण

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | आदी माने

कर्नाळ (ता.मिरज) या गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेला पतीने कौटुंबिक वादातून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांसह उसाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी मनीषा संभाजी कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पती संभाजी बाबासाहेब कदम, सासू इंद्रायणी कदम आणि सासरे बाबासाहेब दत्तात्रय कदम (सर्व रा. कर्नाळ) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, जखमी मनीषा कदम यांचा विवाह संशयित पती संभाजी कदम यांच्या सोबत झाला असून दोघे सासू सासऱ्यांसोबत मिरज तालुक्यातील कर्नाळ गावामध्ये राहतात. शनिवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मनीषा आणि त्यांचे पती संभाजी कदम यांच्यात वाद सुरु असताना, सासू आणि सासरे यांनी त्यांच्या भांडणांमध्ये प्रोत्साहन देऊन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत होते. पती संभाजी कदम यांनी तू माझ्या आईला काही बोलायचे नाही असे म्हणत उसाने बेदम मारहाण करून पीडितेला धमकी देऊन मोबाईल फोडला आहे. मोबाईल का फोडला असे विचारले असता, पुन्हा काठीने मारहाण केली.

घडलेल्या या प्रकारानंतर मनीषा कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही