राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था ; भरघोस निधी मिळूनही, भोंगळ प्रशासन व्यवस्था…
राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करा, अन्यथा, आमरण उपोषण ; धनंजय कुलकर्णी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | विजयनगर – म्हैसाळ ते कागवाड हद्द राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. या खड्यांमुळे रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे भाजपचे धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात म्हैसाळ येथे राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता यांचे प्रतिनिधी मा. श्री शेडे साहेब व रजपूत साहेब यांना निवेदन देऊन रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
या रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. बऱ्याच दुचाकी व चारचाकी गाड्या खुळखुळा होऊन गॅरेज वारी करत आहे. अहो, या रस्त्याकडे कोणी लक्ष देईल का? अशी केविलवाणी अवस्था या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची झाली आहे. विजयनगर – म्हैसाळ ते कागवाड हद्द राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 या रस्त्याचा सम्पर्क जवळपास डजनभर गावांचा असल्याने हा रस्ता अतिशय दयनीय झाल्याने शेतकरी रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांबरोबर या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी पुरते वैतागले आहेत. या रस्त्यावर असंख्य असे छोटे मोठे खड्डे आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
भाजपचे मिरज तालुका विधानसभा प्रभारी आणि भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, पालकमंत्री डॉ.सुरेश (भाऊ) खाडे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गांधाराची भूमिका घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी तीन दिवसात रस्ता दुरुस्त करतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी उपअभियंता शेडे साहेब, रजपूत साहेब, धनंजय कुलकर्णी ,रमेश पाटील, देवगौड गौराजे, गणेश निकम ,नेमिनाथ चौडाज ,विठ्ठल बंडगर, अवधूत नलावडे ,संजय कोळी बाळासाहेब घोरपडे ,सुभाष हिंगमिरे ,मनोज मगदूम ,भरत पाटील, जितेंद्र माळी, मोहिनी कुलकर्णी ,अश्विनी घोरपडे , तयाव्वा अंबी, अर्चना पाटील ,लीलावती सपकाळ ,रूपाली सावंत ,सुनीता चौगुले, सुशीला राजमाने, अनिता यळमल्ली ,सुनीता बनसोडे ,पूजा भाट नम्रता पाटील ,अनिकेत सावंत ,दीपक पाटील ,विजय माळी,अभिषेक शिंदे, मधुकर धुमाळ विकास कांबळे, विजय माळी ,अमोल शिरोटे आप्पा भानुसे ,बाळा भोसले ,मच्छिंद्र करपे विजय माळी, युवराज साळुंखे ,सचिन माळी बाळासाहेब संपकाळ ,दीपक चव्हाण ,अमर पाटील, वैभव माळी ,प्रकाश माने ,अमोल नलवडे ,संजय धुमाळ, राजू मळवाडे आप्पासाहेब कणके, कृष्णा चौगुले ,अभिजीत घोडके ,दादू माळी ,सुरज अभंगे ,मुबारक सौदागर ,बापूसाहेब माळी ,राहुल शिकलगार विशाल चौडाज ,तातोबा पाटील ,ओमकार माने संदीप पवार, विशाल भोरे , उत्तम धुमाळ, शरद करोले ,राजू उपाध्ये ,पोपट पाटील , विजय साळुंखे ,अल्ताफ बैराजदार ,राजू खोत ,अक्षय पाटील, पिंटू उळागडडे, आदिनाथ उळागड्डे,नालसाहब मुल्ला, दत्ता जगताप, संतोष पवार,यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.