महाराष्ट्रसामाजिक

वीर शहीद शिवा काशीद यांच्या नावाने पुलाला नामकरण करण्याची मागणी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने नुकताच बायपास रोड ते माधवनगर रोड असा नवा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाला वीर शहीद शिवा काशीद यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी संजय नगर वार्ड क्रमांक ११ चे भावी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मा. देवानंद बापू शिखरे यांनी केली आहे.

शिवा काशीद हे स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर शहीद होते. स्वराज्यासाठी बलिदान देऊन त्यांनी रयतेप्रति निष्ठा, शौर्य आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याची कायम स्मरण राहावे व तरुण पिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण राहावे, यासाठी हा पूल त्यांच्या नावाने करण्यात यावा, अशी शिखरे यांची आग्रही भूमिका आहे.

याबाबत ते म्हणाले की, आज देशासाठी प्रामाणिक राहणाऱ्या लोकांची गरज आहे. वीर शिवा काशीद हे प्रामाणिकतेचे, त्यागाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहेत. पुलाला त्यांचे नाव दिल्यास भावी पिढीला त्यांच्या कार्याची सतत आठवण राहील.

या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटना तसेच डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय मंच या संस्थांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असून शिखरे यांना या संघटनांचे सहकार्य लाभत आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. मिलिंद विष्णू साबळे यांनी शिखरे यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

या मागणीची दखल घेऊन महानगरपालिकेचे मा. आयुक्त साहेबांनी पुलाचे नामकरण करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही