म्हैसाळ येथे विजेचा शाँक लागून तीन जणांचा मुत्यू-एक जण जखमी :; विजवितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घटना घडली असल्याचा कुटुंबाचा आरोप

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
म्हैसाळ | मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शाँक लागून वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा मुत्यू झाला.तर एक जण जखमी झाला असून त्यांच्या वर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे. प्रदिप श्रीकृष्ण वनमोरे (वय – ३५), पारसनाथ वनमोरे (वय – ४०) शाहीराज पारसनाथ वनमोरे (वय – १२) सर्व राहणार म्हैसाळ अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत वनमोरे (वय – १५) हा जखमी झाला असून यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परीसरात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. यावेळी वीजेची वायर तुटून शेतात पडली होती. त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शाँक लागून त्यांचा मुत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा पारसनाथ यांच्या कडे गेला असता शाहीराज याला ही शाँक लागला. प्रदिप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांना ही शाँक लागून मुत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली. सर्व मुतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
विजवितरणाच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणा मुळे घटना घडली – गुन्हा दाखल करण्याची मागणी
विजवितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा हकनाक बळी गेला.कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबीयांनी केली आहे.