महाराष्ट्र राज्यराजकारण

मिरजकारांचा विषय लय दमदार ; जसा भाजपचा घालवला “खासदार” तसाच मिरज मधून घालवणार “आमदार”

कोणत्याही परिस्थितीत मी मिरज विधानसभा निवडणूक लढणारच : डाॅ. महेशकुमार कांबळे

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | आदी माने

मिरज | पालकमंत्र्याच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने विधानसभेच्या अगोदरच त्यांनी नगरसेवकांना गोळा करुन त्यांच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यांची उमेदवारी देखील धोक्यात आली आहे. त्यांनी गेल्या 15 वर्षात कोणतीच विकासकामे केली नसल्याने त्यांना यांचा आधार घ्यावा लागत आहे. पण मिरजकर जनता ही सुज्ञ आहे. यावेळी त्यांनी बदल करायचे ठरवले आहे. मिरजकर जनता ही पायाखली आणि डोक्यावरती घ्यायला मागेपुढे पाहत नाही असा टोला त्यांनी पालकमंत्र्यांना लावला आहे. तर अडीज हजार कोटी गेले कुठे? त्यांनी फक्त त्यांच्या स्विय सहाय्यकांना व मोजक्या ठेकेदारांना आर्थिक दृषट्या प्रबळ करण्याचे काम काम केले असल्याचाही आरोप केला.आहे .

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टेडियमसाठी ४ ते ५ कोटी खर्च करुन देखील त्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे पहाता त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना केली असल्याचीही त्यांनी टीका केली. पंधरा वर्षात मिरज विधानसभा क्षेत्राचा विकास झालेला नाही, म्हणून मी स्थानिक असून मला मिरजकर जनतेचे प्रश्न माहित असून त्यासाठी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितली. तसेच तिसऱ्या आघाडीकडेही मी उमेदवारी मागितली आहे. जर का पक्षाने आणि तिसऱ्या आघाडीने उमेदवारी दिली नाही तरी देखील मी विधानसभा लढणारच असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही